प्रतिज्ञापत्रकासाठी जोडावं लागणार 5oo रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ

0
14

दि . 5 ( पीसीबी ) – राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारी कार्यालयात लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राची 500 रुपयांची स्टॅम ड्युटीसंदर्भात मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रकासाठी जोडावं लागणार 5oo रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं आहे. तसेच या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिलं आहेत.

दहावी बारावीचा निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी लागणारा खर्च जवळपास 3 हजाराहून अधिक येत असतो. पण महसूल मंत्र्यांच्या या निर्णयामुळं विद्यार्थांसह पालकांना दिलासा मिळाला आहे. एका साध्या कागदावर सेल्फ अटेस्टेड अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळणार आहे.

पूर्वी केवळ 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी साधारणतः 250 रुपये खर्च येत असे, परंतु हा खर्च अचानक 1000 रुपयांपर्यंत वाढल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी होती. शैक्षणिक प्रक्रियेसाठी हा अतिरिक्त खर्च परवडणारा नसल्यामुळे सरकारने त्वरित काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी होत होती.

राज्यात कोणतंही शासकीय काम असो किंवा सरकारी परीक्षेचा अर्ज, नागरिकांना त्या कामासाठी जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र अशी प्रतिज्ञापत्रके जोडावी लागतात. या प्रतिज्ञापत्रकांसोबत एक 500 रुपयांचे मुद्रांकशुल्कही भरावे लागते. विशेषत: दहावी बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांचा ही सर्व प्रमाणपत्र लागतात. पण आता या प्रतिज्ञापत्रकांसोबत भरावे लागणारे 500 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी आता माफ करण्यात आली आहे.

कोणत्या प्रतिज्ञापत्रांसाठी निर्णय लागू?

जात पडताळणी प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी प्रमाणपत्र,नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे

या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत.या सर्व प्रमाणपत्रांना जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क आता जोडावे लागणार नाही.त्या ऐवजी एका साध्या कागदावर ‘सेल्फ अटेस्टेड ‘ अर्ज लिहून ही प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळवता येतील.