पवार साहेबांच्या अंगावरून साप गेला अन्…

0
126

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे शिरूरमध्ये आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे शिरूरमध्ये आहेत. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मंचर म्हटलं की एकच नाव लक्षात येत ते म्हणजे कै.दत्तू पाटील वळसे पाटील…या तालुक्याच नातं पवारसाहेब आणि वळसे यांचं नातं घनिष्ठ होतं. माझी आई आणि मी नेहमी भीमाशंकर ला दर्शनासाठी जात असतो. 1995 साली डिंभे इथं मुक्काम केला. तेव्हा पवार साहेबांच्या अंगावरून साप गेला. तेव्हा दत्तू पाटील म्हणाले शुभ संकेत आहेत. त्यानंतर 8 दिवसात सरकार बनलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देशाचे कृषीमंत्री कोण आहेत…? या देशात कशालाच भाव नाही. मग भाव कशाला आहे? माझा पेपरवर आणि टीव्हीवर विश्वास आहे..अजूनही मी त्याच बातम्या पाहते. लोक म्हणतात शिवाजी आढळराव याच्या कंपनीचं काहीतरी आलंय. पण आपल्याला आपल्या अमोल दादा सारखा खासदार हवा… पक्ष फोडला ना यांनी मागितलं असतं तर सगळं दिलं असतं. नाती तोडणं सोपं पण जोडायला मला आवडते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपल्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण आता आपण मुक्त झालोय. पुत्र प्रेमाचा पण आरोप केला. इथली भाषण ऐकून मला नवल वाटतं. अमोल दादांची भाषणं ऐकून एकतर्फी मतदान झालं पाहिजे. कांद्याचा प्रश्न फक्त अमोल दादांनी मांडला. राज्यातील 38 खासदारांपैकी फक्त एकाने हा प्रश्न मांडला. अमोल दादा आणि माझं निलंबन झालं. कांद्याला हमी भावासाठी मागितला. म्हणून आम्ही कायम मांडणार फाशी झाली तरीही मांडणार आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मी नेहमी भीमाशंकर ला माझ्या आईला घेऊन येणार आहे. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यत असतो. मी रामकृष्ण हरी वाली आहे… माझा पांडुरंगावर विश्वास आहे. शिरुर ला मतं मागायला काही प्रॉब्लेम नाही. आपला उमेदवार एक नंबर आहे… अमोल हा माझ्या भावासारखा आहे. त्यामुळे तुम्ही लोकांनी त्याला साथ दिली पाहिजे, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.