पर्यटनाला चालना…

0
340

मुंबई, दि.९ (पीसीबी)- राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शेतकरी, कामगार, कारखानदार, महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, बेरोजगारांसह जाती धर्माचा आणि संत महात्मायंच्या स्मारकांसाठी घोषणांची खैरात आहे. सर्व महत्वाच्या घोषणांची गोषवारा मुद्दे पुढीलप्रमाणे आहे.

पर्यटनाला चालना…
– प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण
– पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास
– 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार
– राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार. यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश