नदीत आंघोळीसाठी गेलेली ११ मुलं बुडाल्याची घटना, ८ जणांचा मृत्यू

0
17

टोंक दि . १० ( पीसीबी ) : राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात मंगळवारी (१० जून) एक मोठा अपघात घडला. बनास नदीत आंघोळीसाठी गेलेली ११ मुलं बुडाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, जयपूरचे जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र कुमार सोनी टोंकला रवाना झाले आहेत. टोंक एसपींनी ८ मुलांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजारा दिला असून इतरांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बनास नदीत आंघोळीसाठी गेलेले ११ मुलं अचानक नदीच्या प्रवाहात अडकली आणि बुडाली. या हृदयद्रावक घटनेत आतापर्यंत ८ तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. यातील ३ तरुणांना स्थानिक डायव्हर आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीनं वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान, या दुःखद घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पाण्यात बुडालेले सर्व तरुण जयपूरचे रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच जयपूरचे जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र कुमार सोनी टोंकला रवाना झाले आहेत. हा अपघात झाला तेव्हा सर्व तरुण पिकनिकसाठी गेले होते. दरम्यान, रुग्णालयात लोकांची मोठी गर्दी जमली आहे. पोलिस अधीक्षक विकास सांगवान आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बिजेंद्र सिंह भाटी घटनास्थळी उपस्थित होते.