डॉ. हेडगेवारांना भारतरत्न देऊन तरुण पिढीसाठी प्रेरणा निर्माण करावी- जमाल सिद्धीकी

0
72

भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ डॉ. हेगडेवार यांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी डॉ. हेगडेवार हे भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक होते, असे नमूद केले आहे. तसेच, राष्ट्र निर्माणात त्यांनी मोठी भूमिका बजावल्याचेही सिद्दीकी यांनी पत्रात म्हटले आहे. ही मागणी देशाच्या सर्वोच्च सन्मानासाठी एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या योगदानाला अधोरेखित करते. राष्ट्रपतींना पाठवलेल्या या पत्रात डॉ. हेगडेवार यांच्या कार्याची दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

डॉ. हेडगेवार यांना भारतरत्न हे देशाचे सर्वोच्च नागरिक सन्मान देण्यात यावे अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांची राष्ट्रपतीकडे केली आहे. त्या संदर्भात जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्रही पाठवले आहे. डॉ. हेडगेवार भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते. तसेच राष्ट्र निर्माण मध्ये त्यांची मोठी भूमिका असल्याने त्यांना देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच भारतरत्न देऊन तरुण पिढीसाठी एक नवी प्रेरणा निर्माण करावी, अशी मागणी जमाल सिद्धीकी यांनी त्यांच्या पत्राच्या माध्यमातून केली आहे. संघामध्ये कधीच जातीभेद पाळले जात नाही. त्यामुळे एका मुस्लिम स्वयंसेवकाने डॉक्टर हेडगेवार यांच्यासाठी भारतरत्नाची मागणी करणे यात काहीही गैर नसल्याचे जमाल सिद्दिकी म्हणाले.

आरएसएसच्या योगदानावर आधारित टपाल तिकीट, नाणं प्रकाशित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारक टपाल तिकीट आणि विशेष नाणं प्रकाशित करण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये हा समारंभ पार पडेल. या कार्यक्रमात पंतप्रधान सभेला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे विजया दशमीच्या निमित्ताने देशासमोर आणि जगासमोर काय भाषण करणार, त्यापूर्वी एक दिवस आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानावर पंतप्रधान प्रकाश टाकतील अशी अपेक्षा आहे.