पुणे, दि . १० ( पीसीबी ) : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यातील बालगंधर्व येथे पार पडत आहे. या कार्यक्रमाध्ये अनेक दिग्गज नेत्यांची भाषणे पाहायला मिळालीत. यामधील खासदार निलेश लंके यांनी दमदार फटकेबाजी करत सभागृह दणाणून सोडलं. स्वत: शरद पवारही खळखळून हसले. निलेश लंके यांनी आपल्या भाषणात काही किस्से सांगताना त्यांनी पवारांना परीसाची उपमा दिली. लंके काय म्हणाले जाणून घ्या.
पवार साहेबांचा दम तुमच्याआमच्यासारखा नाही. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागले तर आम्हाला विचार करावा लागेल, याच्यात लय दम आहे. आपण काय तर उलटा-पालटा करतो. पण सर्वात मोठा दम साहेबांचा आहे. माझ्यासमोर साहेबांनी एका हस्तीला सांगितलं होतं की लंकेहा माझा कार्यकर्ता आहे. तो लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवत आहे, त्याला जर चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण, त्यानंतर तो काही महिनाभर झोपला नसेल. साहेब हसलेलं हे कळालं तर टांगेखालून जाईल आणि गप का हे समजलं तर लोटांगण घालेन. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही, आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून जायचं. साहेब आपल्यातील परीस आहेत, उदाहरण म्हणजे मी ज्याने ग्रामपंचायत सदस्य स्वप्न न पाहिलेला न माणून खासदार असल्याचं निलेश लंके म्हणाले.
माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईन स्वप्नात पाहिलं नाही, पवारसाहेबांमुळे मी आमदार झालो. मी चिमटा घेतला. खासदार झालो तेव्हा तात्यांना विचारलं खरंच झालोय का खासदार? ही ताकद सगळी पवारसाहेबांची ताकद आहे. राजकारणामध्ये कधी दिवस बदलतील सांगता येत नाही. काहींना लय घाई झाली. आपला नेता आहे ना, आपलं वय नाही तेवढा नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला सगळी गणित जुळतात, आपण हाफ चड्डीवर फिरत होतो तेव्हा आपला नेता महाराष्ट्राचं नाहीतर देशाचं राजकारण करत होता , जरा धीर धरा. शरद पवार हे स्वत:साठी जगले नाहीत, कित्येक लोकांना खुर्चीवर बसवलं. कार्यकर्ता आंदोलनाला बसला तर कलेक्टरला फोन जात असल्यां लंकेंनी सांगितलं.
मी पवार साहेबांसोबत एकदा गाडीत असताना विचारलं या वयात इतकी धावपळ करता तुम्ही हेलिकॉप्टर वापरा. मला साहेब म्हणाले, मी ५०-५५ वर्षे राजकारणामध्ये आहे. समाजकार्यामध्ये असताना मी देशात आणि महाराष्ट्रात अनेक बदल घडवले त्यातील काय बदल झाले आहेत. आणख काय करायची गरज आहे हा विचार करणारे नेते आहेत. साहेबांनी मला सांगितलं, मी गाडीतून उतरल्यावर बघ काय करतो, त्यानंतर पुढे गेल्यावर कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते. तेव्हा त्यांनी पाऊस किती झाला?, पाणी आहे का? शेतात काय माल आहे त्याला भाव काय आहे? अशी दूरदृष्टी असणारा नेता आपल्या भाग्यात आहे याच्यापेक्षा आणखी काय आहे, असंही निलेश लंके म्हणाले.