दि . १४ ( पीसीबी ) – माजी मंत्री बच्चू कडूंचं विविध मागण्यासाठी मागील सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. बच्चू कडू यांना रुग्णालयात दाखल न केल्यास त्यांच्या जीवाला धोका आहे, असं अमरावतीचे तिवसा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी तहसीलदारांना पत्र लिहिले आहे. दरम्यान त्यांच्या या आंदोलनांचे पडसाद आज पुण्यात देखील पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली, यावेळी मोठा गोंधळ झाला, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी अजित पवारांचे भाषण सुरू होताच अमरावतीच्या शेतकऱ्यांनी जाब विचारला, यावेळी महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात अचानक गोंधळ उडाला. बच्चू कडू यांच्या उपोषणावरून आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसले.
नेमकं काय घडलं ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती आहे. दौऱ्यावेळी असणाऱ्या एका कार्यक्रमात माजी मंत्री बच्चू कडूंच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अजित पवारांसमोरच गोंधळ घालायला सुरूवात केली. हे सगळे कार्यकर्ते प्रहार संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाकी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, या प्रकारानंतर कार्यक्रमस्थळी असलेल्या पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘बच्चू कडूंना न्याय द्या’ अशा शब्दांत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहेत. अन्नत्याग आंदोलन केल्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यामुळे प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमात गोंधळ घातला. त्यांनी बच्चू कडूंना न्याय देण्याची मागणी केली. तसेच बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असंही यावेळी घोषणाबाजी करणाऱ्यांनी सांगितलं. यावेळी महिला देखील मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
नेमक्या काय आहेत मागण्या?
- दिव्यांग व विधवा महिलांना रु 6000/- मानधन देण्यात यावे.
- आपल्या संकल्पानूसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी शेतमालाला MSP (हमीभाव) वर 20 टक्के अनुदान देण्यात यावे.
- दि.07 एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या ईतिवृत्तप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे.
- युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात याव्या.
- शहराप्रमाणे ग्रामिण भागातील घरकुलांकरीता समान निकष लावून किमान रू 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.
- शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांच्या अपघाती मृत्यु झाल्यास आर्थीक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजूरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे.
- पेरणी ते कापणी पर्यंत मजूरीची सर्व कामे MSP मध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकांना 3:5 रेषो लावून दुग्ध व्यवसायसूध्दा MSP ला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगाणाच्या धर्तीवर एकरी 10,000/- मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा.
- ज्याप्रमाणे रासायनिक खाताला अनुदान देण्यात येते त्याच प्रमाणे शेणखताला / सेंद्रीयखताला अनुदान देण्यात यावे.
- मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे.
- मनरेगा मधील मजूरी रू 312/- वरून रु.500/- करण्यात यावी.
- निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे.
- दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट रु.50/- प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रू 60/- प्रती लिटर मिळावा. i
- कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान 40/- रूपये बाजार भाव होई पर्यत निर्यात बंदीचा निर्णय करू नये.
- सन 2025-26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रति टन 4300/- रूपये दर 1 टक्के रिकव्हरी बेस रेट धरुन मिळावा. तसेच पुढील 11 टक्के सिकव्हरीसाठी 430/- रूपये एफआरपी दर मिळ वेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व 15 दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावेत.