दि.२९(पीसीबी)-राज्यसभा व लोकसभा निवडणुका महायुती व एनडीए एकत्र लढवणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उमेदवारी व जागावाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर घेण्यात येतील, जेणेकरून कार्यकर्त्यांच्या आकांक्षांना न्याय देता येईल. गोंदियात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी असे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
राज्य आणि देश पातळीवरच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू – प्रफुल्ल पटेल
कार्यकर्त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर रणनिती आखणार – पटेल
पूरग्रस्तांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना भेटी दिल्या – राऊतांच्या टिकेला पटेलांचं उत्तर
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याकडून केंद्राला तीन अहवाल पाठवले
राष्ट्रवादीच्या सर्व आमदार-खासदारांनी एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी दिला
पूरस्थितीबाबत बोलताना प्रफुल पटेल यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून केंद्र सरकारकडे अहवाल सादर करून मदतीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार-खासदारांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे.
विरोधकांच्या टीका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाचा भाग असल्याचे म्हटले प्रफुल पटेल म्हणाले. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.