अलंकापुरीत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नामजयघोषात आगमन आषाढी एकादशी दिनी पालखीची ग्रामप्रदक्षिणा

0
59

आळंदी, दि. ३१ जुलै (पीसीबी) – आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळा हरिनाम गजरात आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट , गोपाळपुर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात सोहळा मंगळवारी ( दि. ३० ) अलंकापुरीत गोरज मुहूर्तावर सव्वा सहाचे दरम्यान आळंदीत प्रवेशाला. परंपरेने बुधवारी ( दि. ३१ ) आळंदीत आषाढी एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे. यावेळी श्रींचे पालखी रथावर पुष्पवृष्टी नगरपरिषदे तर्फे करण्यात आला.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींचे पादुका आळंदी देवस्थानकडे वारीहून आल्यानंतर परंपरेने सुपूर्द करण्यात आल्या. श्रींचे पादुका पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर विना मंडपातून माऊलींचे मंदिरात सोहळा आरतीने विसावला. तत्पूर्वी माऊली मंदिरातून श्रींचे स्वागत प्रथा परंपरेने दिंडी हरिनाम गजरात पालखी सोहळ्यास सामोरी जात महानैवेद्य झाला. अभंग हरिनाम गजरात सोहळ्याचे स्वागत व आगमन झाले. वारकरी शिक्षण संस्था मधील साधकांनी सोहळा आळंदीत प्रवेश प्रसंगी हरिनाम गजरात नाम जयघोष केला. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त अँड. राजेंद्र उमाप , भावार्थ देखणे, वेदमूर्ती हंसराज चक्रांकित, व्यवस्थापक माऊली वीर, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरु, विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, उद्धव रणदिवे चोपदार, ज्ञानेश्वर गुळुंजकर,संजय रणदिवे, तुकाराम माने, भीमराव घुंडरे, नगारखाना सेवक मानकरी बाळासाहेब भोसले, समीर घुंडरे, विनायक घुंडरे, सचिन कुऱ्हाडे, महेश केदारी, महादेव रत्नपारखी यांचे सह मानकरी, दिंडीकरी, वारकरी भाविक उपस्थित होते. आळंदी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पादुका आल्यानंतर श्रींचे संजीवन समाधी मंदिरात आरती झाली. देवस्थान तर्फे मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. आळंदीत पालखी सोहळ्याचे स्वागतास भाविकांनी रस्त्याचे कडेला दुतर्फा उभे राहून गर्दी करीत हरिनाम जयघोषात स्वागत केले. यावर्षी पालखी सोहळ्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने सोहळा मोठ्या आनंदी उत्साही मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.परंपरेने दिंडीने सामोरे जात सोहळ्याचे आळंदीत जुन्या पुला पलीकडे नैवेद्य, आरती झाली. यावेळी वरूणराजाने हलकासा शिडकावा केला. आळंदी पंचक्रोशीतून भाविक, नागरिक श्रींचे सोहळ्याचे स्वागतास मोठ्या संख्येने आले होते.

आळंदीत श्रींचे सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. रांगोळ्यांचे पायघड्या,पुष्पसजावट करण्यात आली. ठिकठिकाणी माऊली भक्त मंडळांनी श्रींचे पालखीवर पुष्प वर्षाव करीत स्वागत केले. भाविकांना विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांचे मूळपीठ येथे ह. भ. प. अवधूत महाराज चक्रांकित आणि परिवाराचे वतीने पिठलं भाकरी चा महाप्रसाद वाटप करण्यात आला. यासाठी भाविकांनी परंपरा जोपासत महाप्रसादास गर्दी केली. अनेक दिवसांचे विरहा नंतर श्रींचे पालखी सोहळा आळंदीत येताच येथे चैतन्य अवतरले. मोठ्या ज्ञानभक्तीमय वातावरणात आळंदीकरांचे वतीने सोहळ्याचे स्वागत आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी कैलास केंद्रे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, अध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील, आजी, माजी पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, संघटना यांचे वतीने करण्यात आले.

यावेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या शालेय मुलांनी रस्त्याचे दुतर्फा उभे राहून तसेच सोहळ्यात धाकट्या पादुका ते आळंदी असा प्रवास करीत सोहळ्याचे हरिनाम गजरात स्वागत केले. या पालखी सोहळ्यात सर्व प्रकारच्या सेवा सुव्यवस्थित आणि सुसज्ज व्यवस्था, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देत सोहळ्याचे चोख नियोजन झाले. उत्साही आनंदात पायी वारी करीत सोहळा वरुणराजाचे संततधारेत सोहळा आळंदीत आला. उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रीधर सरनाईक यांनी श्रींचे सोहळ्यात प्रथा परंपरांचे पालन करीत देवस्थानचे नियंत्रणात कामकाज पाहिले. पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांनी सोहळ्याचे यशस्वीतेस विशेष परिश्रम घेतले. आळंदी शहरात भाविकणासाठी हुंबे महाराज, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, आळंदीकर ग्रामस्थ, विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांनी प्रसाद वाटप केले.
आळंदी सोहळ्यात पोलिस मित्रांचे कौतुक

आळंदीतील पोलिस मित्र युवा महासंघ,पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन यांचे पदाधिकारी शिवाजी जाधव, योगेश जाधव, प्रवीण बोबडे, ज्योती पाटील, किरण कोल्हे, बाबासाहेब भंडारी, वैभव दहिफळे आदींनी आषाढी वारीत बंदोबस्तासाठी सेवा व मदत कार्य करीत पोलीस प्रशासनास सहकार्य केले. पोलिस मित्र परीवाराने केलेल्या सेवा कार्याचे कौतुक पोलीस प्रशासनाने केले आहे. आळंदी परिसरात पोलीस मित्र सेवा यावर्षी हि प्रभावी देण्यात आली. संवाद साधून पोलीस प्रशासनास सहकार्य केल्याने पोलीस मित्रांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाने संवाद साधला.