Maharashtra

औरंगाबादच्या निवडणुकीवर उद्धव ठाकरेंचा ‘वॉच’ आज मतदान

By PCB Author

August 19, 2019

औरंगाबाद, दि. १९ (पीसीबी) – औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य  संस्थेतील मतदारसंघात आज (दि.१९) ला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

यंदा लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचा गड राखण्यात शिवसेनेला अपयश आले. त्यामुळे विधानपरिषदेच्या आजच्या निवडणुकीवर स्व:ता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वॉच या निवडणुकीवर आहे. मंत्री एकनाथ शिंदे , रामदास कदम यांनी युतीच्या सर्व मतदारांना तंबी दिली आहे. तसेच गद्दारी केल्यास सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.

लोकसभेत एमआयएमने बाजी मारंत चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागगले. त्यामुळे आता कोणतीही रिस्क नाही म्हणून खुद्द उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये लक्ष घातले आहे.