Maharashtra

कलम ३७० हटवण्यामागे अमेरिकेचा हात – प्रकाश आंबेडकर

By PCB Author

August 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा आणि काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले .

कलम ३७० हटवण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे .तसेच केंद्र सरकारने जम्मू–काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याचा निर्णय अतिशय घाईत घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केल्यास, घटनेनुसार विदर्भ प्रांताला मिळालेला विशेष अधिकार आणि अन्य काही राज्यांना असलेला विशेष दर्जा धोक्यात येऊ शकतो असं विधाही आंबेडकर यांनी केले.