Maharashtra

साई संस्थानकडून १० कोटींची पूरग्रस्तांना मदत

By PCB Author

August 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – साई संस्थान शिर्डी यांच्याकडून कोल्हापूर, सांगली, सातारा या पूरग्रस्त भागातील नागरिकांना १० कोटीची मदत करण्यात येणार आहे. अशी माहिती साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ट्विटरवरून दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने कोल्हापूर, सांगली, कराड आदी भागांत प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. लेकरे–बाळे उघड्यावर पडलीत, म्हणून साई संस्थान शिर्डी कडून १० कोटींची मदत करण्यात येणार आहे.