MPSC पास झालेल्या ८०० विद्यार्थ्यांना नारळ; सेवेत दाखल होण्यापुर्वीच नियुक्ती रद्द

0
449

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे MPSC मध्ये पास झालेल्या ८०० हून अधिक मुलांना सेवेत दाखल होण्यापूर्वीच नारळ मिळाला आहे.  राज्य स्पर्धा परीक्षा मंडळामार्फत गेल्यावर्षी घेतलेल्या परिवहन निरीक्षक पदाच्या निवडी नागपूर खंडपीठाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ८३३ यशस्वी विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. या विद्यार्थ्यांवर सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वैफल्यात जायची वेळ आली असून, हातातील नोकऱ्या सोडून घरी बसलेल्या या तरुणांचे आता आभाळच फाटले आहे.