Maharashtra

#MeToo: खरं-खोटं नंतर पाहू; आता महिलांचं ऐकलं पाहिजे – अमृता फडणवीस

By PCB Author

October 18, 2018

नाशिक, दि. १८ (पीसीबी) –  #MeToo मोहिमेमुळे महिला पुढे येऊन बोलत आहेत. त्यात काय खरे, काय खोटे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र, त्यांचे ऐकले पाहिजे, असे प्रतिपादन करत अमृता फडणवीस यांनी म्हटले मीटू मोहिमेतील महिलांची पाठ राखन केली आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात त्या बोलत असताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

#MeToo मोहिमेअंतर्गत बॉलिवूड आणि शहरी भागातील महिला बोलत आहेतच. पण त्यांच्यासह ही चळवळ ग्रामीण भागातही गेली पाहिजे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शबरीमाला मंदिरात प्रवेशाचा सर्वांना समान हक्क आहे. सर्वांना प्रवेश मिळाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, महिला आणि मुलींनी रूढी परंपरांना थारा न देता, कोणताही न्यूनगंड न बाळगता सॅनिटरी नॅपकिन वापरावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.