Desh

‘IPL म्हटलं की स्टेडियममध्ये गोंगाट व्हायचाच’

By PCB Author

July 16, 2019

मुंबई, दि,१६ (पीसीबी) – आयपीएल सामन्याच्या दरम्यान मुंबई-पुण्यात ध्वनी प्रदूषण मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा आरोप, विधीज्ञ कपिल सोनी यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित दाखल करण्यात आली होती. यावेळी क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान लोकांचा गोंगाट होणे साहजिक आहे, हरकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयान् काल सांगितले.

दरम्यान,चौकार-षटकार मारल्यानंतर लोक जल्लोष करणार हे साहजिकच आहे, अशावेळी लोकांना आनंद घेऊ द्या असे मत मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी व्यक्त केलं आणि याचिका फेटाळून लावली.