Maharashtra

कोल्हापूर, सांगली पाण्यात तर मुख्यमंत्री प्रचारात – प्रकाश आंबेडकर

By PCB Author

August 09, 2019

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – कोल्हापूर व सांगली शहर पाण्यामध्ये आहे, पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना अन्न, कपडे आणि पिण्याच्या पाण्याची गरज आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान, पूरग्रस्त भागातील अनेक गावांमध्ये शासकीय मदत मदत पोहचली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी पक्षपातळीवर हजर रहावे, तसेच अन्न, गरम कपडे, औषधे आदी साहित्याची मदत करावी, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले आहे.