पुरग्रस्तांकडे पाठ फिरवणारे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री कसे होणार? – प्रकाश आंबेडकर

0
410

नागपूर, दि. ११ (पीसीबी) – कोल्हापूर, सांगली, सातारा येथे निर्माण झालेल्या. पूरपरिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे. त्यांनी शिवसेना पक्ष सध्या आपले नेते आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री कसे होणार यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांना पूरग्रस्तांशी काहीही देणे-घेणे नाही. अशा शब्दात आदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे.

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘सरकारमध्ये संवेदनशीलता अजिबात उरलेली नाही. सरकारने मदतीकडे पाहिजे तेवढे लक्ष दिलं नाही. कोल्हापूर सांगलीत आलेल्या महापूरामुळे अनेकांचे संसार मोडून पडलेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक रकमी पैसे खर्च करण्याचे आदेश द्यावेत’ अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.