काँग्रेस मुक्त देश व राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र केल्यावरच राजकारण स्वच्छ होईल – पंकजा मुंडे

0
615

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस मुक्त देश व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र ही दिलेली घोषणा प्रत्येक्षात आणल्याशिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही.  आघाडी हे जातीपातीचे राजकरण करत आहे. अशी टिका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी थेरगाव येथे केली.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ थेरगावात आयोजित केलेल्या सभेत मुंडे बोलत होत्या.

त्यावेळी महापौर राहुल जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार अमर साबळे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य खादी व ग्रामद्योग मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हेमंत तापकीर, एकनाथ पवार, उमा खापरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, “राष्ट्रवादीच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटे असतात, हे घड्याळ २४ ऑक्टोबरला कायमचे बंद करायचे आहे. देशातील जनतेचा भाजपवर विश्वास असून त्यामुळे जनतेने भाजपला लोकसभेत निवडून दिले. भाजपने ३७० कलम रद्द करण्याचा दणदणीत निर्णय घेतला. त्याचा महिलांना अभिमान आहे, कारण देशात सर्वत्र तिरंगा फडकत आहे.”