Maharashtra

‘अबकी बार २२० पार’ चंद्रकांत पाटलांना हे अगोदर कळतं; पावसाबद्दल माहीत नाही

By PCB Author

August 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत आहे. या पूरस्थिती विषयी बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एवढा पाऊस पडेल असा अंदाज नव्हता त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे असं विधान केले होते.

यांना अबकी बार २२० पार बर समजतं परंतू कधि किती पाऊस पडणार हे माहित नसते. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी ट्वीट करून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी ‘सर्वांनी एकी ठेवली पाहिजे. तसेच संकटावर सगळे एकत्र मिळून मात करू. तसेच महाराष्ट्रातील मराठी माणूस संकटावर एकजुटीने मात करतो हे जगाला दाखवून देऊ’ अशा शब्दात राज्यातील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.