<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Others &#8211; Pimpri Chinchwad Bulletin</title>
	<atom:link href="https://pcbtoday.in/category/others/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://pcbtoday.in</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Sun, 19 Apr 2026 07:27:33 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.5.4</generator>

<image>
	<url>https://pcbtoday.in/wp-content/uploads/2018/07/new-pcb-logo-150x150.png</url>
	<title>Others &#8211; Pimpri Chinchwad Bulletin</title>
	<link>https://pcbtoday.in</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेची धडक कारवाई सुरूच; तीन दिवसांत ४५ हजार २८९ चौरस फूट अतिक्रमण हटविले</title>
		<link>https://pcbtoday.in/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 19 Apr 2026 07:27:28 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Others]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=200824</guid>

					<description><![CDATA[पिंपरी, दि. १८ &#8211; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब, क, इ, ग, व फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १५ ते १७ एप्रिल २०२६ रोजी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात धडक निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ४६ अनधिकृत बांधकामे व पत्राशेड निष्कासित करण्यात आले असून सुमारे ४५ हजार २८९ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्यात आली. [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>पिंपरी, दि. १८ &#8211; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब, क, इ, ग, व फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १५ ते १७ एप्रिल २०२६ रोजी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात धडक निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ४६ अनधिकृत बांधकामे व पत्राशेड निष्कासित करण्यात आले असून सुमारे ४५ हजार २८९ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेच्या तसेच शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली.</strong></p>



<p>‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत दि. १७ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग क्र. १८ चिंचवड येथे एकूण ९ अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २१,७९८ चौरस फूट क्षेत्रफळावरील अतिक्रमण हटविण्यात आले.</p>



<p>‘क’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत दि. १६ एप्रिल रोजी प्रभाग क्र. ६ भोसरी, सद्गुरूनगर परिसरात ३ अनधिकृत पत्राशेड (१६२ चौरस फूट) तसेच प्रभाग क्र. २ पुणे-नाशिक महामार्ग, बोऱ्हाडेवाडी परिसरात ४ पत्राशेड (१,५५० चौरस फूट) यावर निष्कासन कारवाई करण्यात आली. तसेच दि. १७ एप्रिल रोजी प्रभाग क्र. ६ भोसरी, सद्गुरूनगर परिसरातील ३ अनधिकृत आरसीसी बांधकामांवर कारवाई करून सुमारे २,०९९ चौरस फूट क्षेत्रफळ मोकळे करण्यात आले.</p>



<p>‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दि. १७ एप्रिल रोजी प्रभाग क्र. ०३ मौजे मोशी/डूडूळगाव येथे धडक कारवाई पथकाद्वारे १ अनधिकृत पत्राशेड बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंदाजे ६५० चौरस फूट क्षेत्रफळावरील अतिक्रमण हटविण्यात आले.</p>



<p>‘फ’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत दि. १६ एप्रिल रोजी चिखली येथील प्राईम पार्क, शेलार वस्ती परिसरात नियमबाह्य व्यावसायिक बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ३,६६० चौरस फूट क्षेत्रफळावरील ८ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.</p>



<p>‘ग’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत दि. १५ एप्रिल रोजी प्रभाग क्र. २७ मधील सिंहगड कॉलनी, सज्जनगड कॉलनी, ज्ञानदीप कॉलनी, न्यू डी.पी. रस्ता, शिवालय कॉलनी, रहाटणी येथे सुमारे ४,११२ चौरस फूट क्षेत्रफळावरील ७ अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर तसेच नाल्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर दि. १६ एप्रिल रोजी प्रभाग क्र. २४ व २७ मधील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ५,४११ चौरस फूट क्षेत्रफळावरील ४ अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच दि. १७ एप्रिल रोजी प्रभाग क्र. २३ व २१ मधील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ५,८४६ चौरस फूट क्षेत्रफळावरील ७ अनधिकृत बांधकामे व पत्राशेड निष्कासित करण्यात आली.</p>



<p>आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तर क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर, अजिंक्य येळे, तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली उपअभियंते, धडक कारवाई पथक, बीट निरीक्षक, एम. एस. एफ जवान, पोलीस कर्मचारी, महापालिका मजूर, ठेकेदार यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबी ब्रेकर, ट्रॅक्टर ब्रेकर आदी उपकरणांचा वापर करण्यात आला.</p>



<p>दरम्यान, महानगरपालिकेकडून अशा प्रकारच्या अतिक्रमणांविरोधातील कारवाई सातत्याने सुरू राहणार असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>महापालिकेचे २५० कोटी रुपयांच्या हक्काचे उत्पन्न बुडाले; मंत्र्यांचे अपयश आणि प्रशासकीय नाकर्तेपणामुळे शहराचे कोट्यवधींचे नुकसान!</title>
		<link>https://pcbtoday.in/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a5%a8%e0%a5%ab%e0%a5%a6-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 19 Apr 2026 07:20:20 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Others]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=200820</guid>

					<description><![CDATA[जळगाव: एकीकडे जळगाव शहर मूलभूत सोयीसुविधांसाठी तरसत असताना, दुसरीकडे जळगाव महानगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांच्या भाडेवाढीचा प्रश्न मंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या &#8216;नाकर्तेपणामुळे&#8217; अजूनही रेंगाळलेलाच आहे. या प्रकरणातील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे महापालिकेच्या तिजोरीला दररोज हजारो रुपयांचा चुना लागत असून, शहराच्या विकासाचा अक्षरशः गळा घोटला जात आहे. महानगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांच्या भाडेवाढीच्या वादामुळे महापालिकेचे झालेले आर्थिक नुकसान डोळे पांढरे [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>जळगाव: एकीकडे जळगाव शहर मूलभूत सोयीसुविधांसाठी तरसत असताना, दुसरीकडे जळगाव महानगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांच्या भाडेवाढीचा प्रश्न मंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या &#8216;नाकर्तेपणामुळे&#8217; अजूनही रेंगाळलेलाच आहे. या प्रकरणातील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे महापालिकेच्या तिजोरीला दररोज हजारो रुपयांचा चुना लागत असून, शहराच्या विकासाचा अक्षरशः गळा घोटला जात आहे.</strong></p>



<p>महानगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांच्या भाडेवाढीच्या वादामुळे महापालिकेचे झालेले आर्थिक नुकसान डोळे पांढरे करणारे आहे: गाळेधारकांकडे असलेल्या थकीत भाड्याची रक्कम आता शेकडो कोटींच्या घरात पोहोचली आहे. अनेक वर्षांपासून जुन्या दरानेच भाडे भरले जात असल्याने किंवा अनेक गाळेधारकांनी भाडेच न भरल्याने महापालिकेचे उत्पन्न शून्य झाले आहे. रेडी रेकनरच्या दराप्रमाणे जर भाडेवसुली झाली असती, तर महापालिकेला दरवर्षी अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांचेअतिरिक्त उत्पन्न मिळाले असते. मात्र, वाद न सुटल्याने गेल्या १० वर्षांत शहराने सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांच्या हक्काच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे. थकीत रकमेवरील व्याजाचा आकडाच आता मूळ रकमेपेक्षा जास्त झाला आहे, ज्यामुळे वसुली करणे प्रशासनासाठी &#8216;अशक्य&#8217; मिशन बनले आहे.</p>



<p>जळगावचे गिरीश महाजन व गुलाबराव पाटील हे दिग्गज मंत्री आणि लोकप्रतिनिधी वारंवार या प्रश्नावर तोडगा काढण्याचे &#8216;आश्वासन&#8217; देतात, मात्र प्रत्यक्षात गाळेधारक आणि प्रशासन यांच्यातील हा तिढा सोडवण्यात त्यांना पूर्णपणे अपयश आले आहे. केवळ व्होट बँकेच्या राजकारणामुळे आणि गाळेधारकांच्या दबावामुळे शहराच्या हिताचा बळी दिला जात असल्याची संतप्त भावना सामान्य जळगावकरांमध्ये उमटत आहे.</p>



<p>महानगरपालिकेकडे स्वतःचा विकास निधी नसल्याचे रडगाणे नेहमीच गायले जाते. मात्र, जर या ५२ पेक्षा जास्त शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांची भाडेवसुली वेळेत झाली असती, तर आज शहराचे रस्ते, ड्रेनेज आणि पथदीपांची अवस्था इतकी दयनीय राहिली नसती. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि राजकीय दबावामुळे जळगाव महापालिका आता आर्थिकदृष्ट्या मृत्यूशय्येवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>रक्ताच्या नात्यात शिरले &#8216;सैतान&#8217;; किरकिरीला कंटाळून नराधम नातीने ८२ वर्षीय अर्धांगवायूग्रस्त आजीला ठेचून मारले!</title>
		<link>https://pcbtoday.in/%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 19 Apr 2026 07:16:22 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Others]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=200817</guid>

					<description><![CDATA[करमाळा (सोलापूर): माणुसकी नेमकी कुठे चालली आहे? असा थरकाप उडवणारा प्रश्न सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील विहाळ गावात निर्माण झाला आहे. ज्या नातीने आजीची सेवा करायला हवी होती, त्याच नातीने केवळ &#8216;किरकिर&#8217; करते म्हणून आपल्या ८२ वर्षांच्या असहाय्य आजीचा जीव घेतला. मृत जनाबाई भगवान सुरवसे (वय ८२) या गेल्या अनेक दिवसांपासून अर्धांगवायूने त्रस्त होत्या. शरीर साथ देत [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>करमाळा (सोलापूर): माणुसकी नेमकी कुठे चालली आहे? असा थरकाप उडवणारा प्रश्न सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील विहाळ गावात निर्माण झाला आहे. ज्या नातीने आजीची सेवा करायला हवी होती, त्याच नातीने केवळ &#8216;किरकिर&#8217; करते म्हणून आपल्या ८२ वर्षांच्या असहाय्य आजीचा जीव घेतला.</strong></p>



<p>मृत जनाबाई भगवान सुरवसे (वय ८२) या गेल्या अनेक दिवसांपासून अर्धांगवायूने त्रस्त होत्या. शरीर साथ देत नसल्याने त्या अगतिक होत्या. मात्र, त्यांची ही अगतिकता नात मनिषा रविंद्र लवंगारे (वय ३६) हिच्यासाठी केवळ &#8216;कटकट&#8217; ठरली. रात्रीच्या अंधारात जेव्हा जग शांत होते, तेव्हा या नराधम नातीने आपल्याच रक्ताच्या नात्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. केवळ मारहाण करून या नराधम नातीचे मन भरले नाही, तर तिने क्रौर्याची सीमा ओलांडली. ८२ वर्षांच्या वृद्ध आजीचे डोके जोराने भिंतीवर आपटले. अर्धांगवायूमुळे प्रतिकार करण्याची शक्ती नसलेल्या त्या माऊलीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. स्वतःच्या हाताने स्वतःचा वंश वाढवणाऱ्या आजीला अशा पद्धतीने मारताना या नातीचे हात एकदाही थरथरले नाहीत, हे समाजाचे मोठे नैतिक अध:पतन आहे.</p>



<p>&#8216;पुरावा&#8217; नष्ट करण्यासाठी सुरुवातीला हा नैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू असल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने आणि उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांच्या पथकाला संशय आला. वैद्यकीय अहवालात जेव्हा आजीच्या शरीरावरील जखमांचे भीषण वास्तव समोर आले, तेव्हा पोलिसांच्या सखोल चौकशीसमोर या &#8216;कसाई&#8217; नातीने आपला गुन्हा कबूल केला.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>‘समग्र महात्मा फुले’ परिसंवादातून घेण्यात आला सामाजिक परिवर्तनाचा वैचारिक मागोवा</title>
		<link>https://pcbtoday.in/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 19 Apr 2026 07:11:44 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Others]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=200813</guid>

					<description><![CDATA[पिंपरी, दि. १९ :- क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा सखोल वेध घेत शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, जातीभेद निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांवर आधारित समाजरचनेची आवश्यकता अधोरेखित करताना, या महापुरूषांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता ‘समग्र महात्मा फुले’ या परिसंवादातून स्पष्ट करण्यात आली. तसेच त्यांचे साहित्य, कार्य आणि चळवळींमधून [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>पिंपरी, दि. १९ :- क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा सखोल वेध घेत शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, जातीभेद निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांवर आधारित समाजरचनेची आवश्यकता अधोरेखित करताना, या महापुरूषांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता ‘समग्र महात्मा फुले’ या परिसंवादातून स्पष्ट करण्यात आली. तसेच त्यांचे साहित्य, कार्य आणि चळवळींमधून उभ्या राहिलेल्या मानवतावादी दृष्टिकोनाचा स्वीकार करून सामाजिक न्यायाची वाट अधिक बळकट करण्याचा संदेश परिसंवादातून देण्यात आला.</strong></p>



<p>पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ मध्ये समारोपीय कार्यक्रमात ‘समग्र महात्मा फुले’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये विविध मान्यवर वक्त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा, साहित्याचा आणि त्यांच्या सामाजिक विचारांचा सखोल आढावा घेत समाजपरिवर्तनातील त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.</p>



<p>या परिसंवादात साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, माजी आमदार अँड. जयदेव गायकवाड, फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश पवार सहभागी झाले होते. यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ संध्या हरिभक्त, डॉ सुजाता नांगरे, ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार, राजू मोहन, कामगार नेते निवृत्ती आरवडे, तुकाराम गायकवाड, गणेश भोसले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>



<p>साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी महापुरुषांनी संत साहित्य आत्मसात करून समाजपरिवर्तनासाठी कसे प्रयत्न केले, यावर प्रकाश टाकला. महात्मा फुले हे त्यापैकी एक प्रभावी व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडवले, असे त्यांनी नमूद केले. मराठी भाषेच्या जतनात फुले यांच्या साहित्याचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांमधून प्रेरणा घेतल्याचेही स्पष्ट केले. फुले यांच्या लिखाणातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना ‘तिसरे गुरू’ का मानले, याची जाणीव होते, असे ते म्हणाले. आजच्या पिढीने त्यांच्या साहित्याचे वाचन करून त्यातील विचार आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.</p>



<p>ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ यांसारख्या ग्रंथांमधून महात्मा फुले यांनी तत्कालीन व्यवस्थेवर केलेल्या प्रखर प्रहाराचे विवेचन केले. त्या काळातील सामाजिक विषमता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यावर भाष्य करत त्यांनी फुले यांनी पुणे व महाराष्ट्रातील प्रस्थापित व्यवस्थेला थेट आव्हान दिल्याचे सांगितले. ‘तृतीय रत्न’ या नाटकासह त्यांनी केलेले साहित्यलेखन हे सामाजिक बदलासाठी प्रभावी साधन ठरले, असेही त्यांनी नमूद केले. जातीभेद निर्मूलनासाठी फुले आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य सर्वसमावेशक असून या महान व्यक्तिमत्त्वांना कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.</p>



<p>माजी आमदार अँड. जयदेव गायकवाड यांनी महात्मा फुले यांच्या कार्यातील मानवतावादी दृष्टिकोन अधोरेखित केला. संपूर्ण देशातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली, असे ते म्हणाले. त्यांच्या वाड्यातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा उभारला. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून ३५ बालकांचे संगोपन करण्यात आले, ही त्यांची संवेदनशीलता अधोरेखित करणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या विचारांचा प्रभाव पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीवरही दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.</p>



<p>फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे व्यापक आणि वैश्विक स्वरूप स्पष्ट केले. ‘गुलामगिरी’ या ग्रंथाने भारतीय समाजातील क्रांतीचे बीज रोवले, असे सांगत त्यांनी फुले यांच्या कार्याचा इतिहास अधिक व्यापकपणे मांडण्याची गरज व्यक्त केली. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमुळे समाजात जागृतीची चळवळ निर्माण झाली आणि सामाजिक क्रांतीची ज्योत पेटली, असे ते म्हणाले. फुले यांची भाषाशैली प्रभावी आणि विचारप्रवर्तक असून त्यांनी ‘विज्ञानाची काच धरा’ असा दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, त्यांच्या कार्याचे लाभधारक मोठ्या प्रमाणावर स्त्रिया असूनही आज अनेक ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा विसर पडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.</p>



<p>एकूणच या परिसंवादातून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा परस्पर संबंध, त्यांची सामाजिक समतेसाठीची लढाई आणि आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता यावर सखोल चर्चा झाली.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;दादां&#8217;च्या स्मृतींना आणि कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी साद; पिंपरी-चिंचवडमधील बारामतीकरांचा भव्य &#8216;कृतज्ञता मेळावा’..</title>
		<link>https://pcbtoday.in/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 17 Apr 2026 10:40:38 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Others]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=200764</guid>

					<description><![CDATA[दि.१७(पीसीबी)- बारामती आणि पिंपरी-चिंचवड हे केवळ दोन भौगोलिक भाग नसून ते एका अतूट नात्याने जोडलेले कुटुंब आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवाचे शिल्पकार, जनमानसातील अढळ स्थान असलेले आदरणीय स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना आगळेवेगळे अभिवादन करण्यासाठी शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>दि.१७(पीसीबी)- बारामती आणि पिंपरी-चिंचवड हे केवळ दोन भौगोलिक भाग नसून ते एका अतूट नात्याने जोडलेले कुटुंब आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवाचे शिल्पकार, जनमानसातील अढळ स्थान असलेले आदरणीय स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना आगळेवेगळे अभिवादन करण्यासाठी शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे &#8216;कृतज्ञता मेळाव्याचे&#8217; आयोजन करण्यात आले आहे.</strong></p>
<p>पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करण्यात दादांचे योगदान शब्दातीत आहे. आज दादा जरी आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेली विकासाची दृष्टी आणि सामान्यांसाठी लढण्याची जिद्द आपल्या मनात जिवंत आहे. याच भावनेतून, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या उप मुख्यमंत्री नामदार सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत. दादांच्या पश्चात ही लढाई केवळ राजकीय नसून, ती दादांच्या विकासाच्या परंपरेला साथ देण्याची एक भावनिक जबाबदारी आहे.</p>
<p>बारामती मित्र मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित या मेळाव्यात पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या सर्व बारामतीकर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि सुनेत्रावहिनींना बळ देण्यासाठी हे एकत्र येणे काळाची गरज आहे. हा राजकीय मेळावा नसून, दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करण्याची ही संधी आहे. दादांनी या शहराला वैभव दिले, आता वेळ त्यांच्या विचारांना आणि वहिनींच्या नेतृत्वाला ताकद देण्याची आहे, असे आवाहन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. तसेच बारामती मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बारामतीकरांना या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.</p>


]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे देशात &#8216;लव्ह जिहाद&#8217;च्या घटनांमध्ये वाढ &#8211; नातेश राणेचित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन</title>
		<link>https://pcbtoday.in/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%82/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 17 Apr 2026 07:08:14 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Others]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=200754</guid>

					<description><![CDATA[नाशिक, दि. १७ &#8211; हिरवे साप जास्त वळवळ करायला लागलेत. त्यांना वेळीच ठेचले पाहिजे, नाहीतर घरापर्यंत येतील असं म्हणतं नितेश राणे यांनी नाशिकच्या लव्ह जिहाद प्रकरणातील वादाला तोंड फोडलं आहे. शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे देशात &#8216;लव्ह जिहाद&#8217;च्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला. चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. परत टोप्याचा फोटो इथं [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>नाशिक, दि. १७ &#8211; हिरवे साप जास्त वळवळ करायला लागलेत. त्यांना वेळीच ठेचले पाहिजे, नाहीतर घरापर्यंत येतील असं म्हणतं नितेश राणे यांनी नाशिकच्या लव्ह जिहाद प्रकरणातील वादाला तोंड फोडलं आहे. शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे देशात &#8216;लव्ह जिहाद&#8217;च्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला. चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.</strong></p>



<p>परत टोप्याचा फोटो इथं दिसला तर तांडव करेल. तुमचा बाप असेल तर पाकिस्तानमध्ये जा. हिंदुस्थानमध्ये घाण साफ करायची आम्ही पीएचडी केली आहे. तेव्हा काठी घेऊन काही उभे होते पण काही केलं नाही. मंत्रालयात जातांना सगळे व्हिडीओ घेऊज जातोय. पीआयला सांगतो वातावरण खराब करू नका. देवाभाऊच सरकार आहे त्यांचे नाव खराब करू नका. पहिले हिंदूच हित बघितले जाते, मग नंतर हिरव्या सापाचे बघू, नाशिकचे उदाहरण समोर आहे.</p>



<p>नितेश राणे यांनी सांगितले की, मीडियाचे लोक दांडे घेऊन आले आहेत. तसेच मोठ्या कंपनीत आम्ही त्यांना नोकऱ्या पोट भरण्यासाठी देतो. नोकरी मिळाल्यावर पोट भरत नाहीतर धर्म वाढवत आहे. त्यांची मानसिकता जिहादी आहेत निदा खान एचआर लपून बसली आहे. कुठल्या बिळात जाऊन बसली आहे? असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. कुठेही गेली तरी बरोबर बाहेर काढतो. दिल्ली बॉम्ब स्फोटातील बाई तिच्याशी संबंधित आहे. हिंदू बहिणींना धर्म परिवर्तन, बीफ खायला देत होती.</p>



<p>नितेश राणे यांनी असा दावा केला की, शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे देशात &#8216;लव्ह जिहाद&#8217;च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्या मते, या चित्रपटांमधील विशिष्ट दृश्यांचा आणि सादरीकरणाचा परिणाम तरुण पिढीवर होऊन अशा घटना घडत आहेत.</p>



<p>त्यांनी जाहीर सभेत लोकांना शाहरुख खान आणि आमिर खान यांचे चित्रपट पाहू नका, असे थेट आवाहन केले. प्रेक्षकांनी या &#8216;खान&#8217; कलाकारांच्या चित्रपटांऐवजी हिंदू कलाकारांच्या चित्रपटांना (उदा. &#8216;धुरंधर&#8217;, &#8216;छावा&#8217;) पसंती द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी असा आरोप केला की, बॉलीवूडमधील काही मंडळी नोकरी आणि ग्लॅमरचा वापर करून हिंदू महिलांचे धर्मांतर करण्यासाठी किंवा त्यांना लक्ष्य करण्यासाठी करत आहेत.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>बीड जिल्ह्यात मुलिंचा जन्मदर पुन्हा घसरला, १००० मुलांमागे ८६२ मुली</title>
		<link>https://pcbtoday.in/%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%a1-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%a8/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 17 Apr 2026 06:45:07 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Others]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=200751</guid>

					<description><![CDATA[बीड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा मुलिंचा जन्मदर घसरला आहे. १००० मुलांमागे गेल्या वर्षी ९३७ मुलींचा जन्मदर होता मात्र यावर्षी मुलींचा जन्मदर पुन्हा घसरला असून एक हजार मुलांमागे ८६२ मुलींचा जन्म होत आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडून आम्ही सोनोग्राफी सेंटरची तपासणी करणार आहोत विनापरवाना कोणी सोनोग्राफी सेंटर चालवत असेल किंवा दोषी आढळून येत असेल [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>बीड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा मुलिंचा जन्मदर घसरला आहे. १००० मुलांमागे गेल्या वर्षी ९३७ मुलींचा जन्मदर होता मात्र यावर्षी मुलींचा जन्मदर पुन्हा घसरला असून एक हजार मुलांमागे ८६२ मुलींचा जन्म होत आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडून आम्ही सोनोग्राफी सेंटरची तपासणी करणार आहोत विनापरवाना कोणी सोनोग्राफी सेंटर चालवत असेल किंवा दोषी आढळून येत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू तसेच पर जिल्ह्यात जाऊन जर कोणी सोनोग्राफी करत असेल तर आम्ही ट्रॅकिंग करू आणि जर कोणी दोषी आढळून येत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करू असे सांगण्यात आले आहे.</strong></p>


]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>रिलस्टार महिला सोनालीचा खून अनैतिक प्रेमसंबंधातून</title>
		<link>https://pcbtoday.in/%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 17 Apr 2026 06:41:55 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Others]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=200747</guid>

					<description><![CDATA[भोसे येथील रिलस्टार महिला सोनाली नेताजी जाधव (वय 34) हिचा अनैतिक प्रेमसंबंधातून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोनाली ही सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होती आणि परिसरात रिलस्टार म्हणून ओळखली जात होती. काही कौटुंबिक कारणांमुळे ती पतीपासून वेगळी राहून आपल्या माहेरी भोसे येथे राहत होती.]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>भोसे येथील रिलस्टार महिला सोनाली नेताजी जाधव (वय 34) हिचा अनैतिक प्रेमसंबंधातून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोनाली ही सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होती आणि परिसरात रिलस्टार म्हणून ओळखली जात होती. काही कौटुंबिक कारणांमुळे ती पतीपासून वेगळी राहून आपल्या माहेरी भोसे येथे राहत होती.</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर; पक्ष संघटना बळकटीकरणावर भर</title>
		<link>https://pcbtoday.in/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 17 Apr 2026 06:36:12 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Others]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=200744</guid>

					<description><![CDATA[महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमित ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. संपर्कप्रमुखपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे यांचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. त्याकडे राजकीय वर्तुळातून विशेष लक्ष दिले जात आहे. आगामी काळातील निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यातील मनसेची संघटनात्मक शक्ती वाढवणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमित ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. संपर्कप्रमुखपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे यांचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. त्याकडे राजकीय वर्तुळातून विशेष लक्ष दिले जात आहे. आगामी काळातील निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यातील मनसेची संघटनात्मक शक्ती वाढवणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात अमित ठाकरे पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांशी सविस्तर संवाद साधणार आहेत.</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>अमरावती लैंगिक अत्याचारातील आरोपी अयाजच्या वाढदिवसाला पोलीस हजर</title>
		<link>https://pcbtoday.in/%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%88%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 17 Apr 2026 06:06:56 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Others]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=200740</guid>

					<description><![CDATA[अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओप्रकरणातील आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर हा अघ्या 19 वर्षांचा आहे. त्याच्यासोबत त्याच्या इतर आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपीने परतवाड्यातील एका हमरस्त्यावर त्याचा मध्यरात्री वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला केक भरवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे याप्रकरणात तपास निःपक्ष कसा होईल असा [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओप्रकरणातील आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर हा अघ्या 19 वर्षांचा आहे. त्याच्यासोबत त्याच्या इतर आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपीने परतवाड्यातील एका हमरस्त्यावर त्याचा मध्यरात्री वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला केक भरवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे याप्रकरणात तपास निःपक्ष कसा होईल असा सवाल करण्यात येत आहे. त्याच्या वाढदिवसाला पोलिसांची हजेरी तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.</strong></p>



<p>परतवाडा येथील एका हमरस्त्यात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. व्हिडिओ डिसेंबर 2025 मधील आहे. या व्हिडिओत त्याचे मित्र आणि गुन्ह्यातील आरोपी स्पष्ट दिसत आहेत. तर त्याचवेळी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी सुद्धा याव्हिडिओत सहभागी झाल्याचे दिसते. पोलिसांनी वाहन थांबवले आणि ते वाढदिवसाच्या सोहळ्यात सहभागी झाले. त्यांनी आरोपीला केकही खाऊ घातल्याचे दिसत आहे. यामुळे आरोपीचे पोलिसांसोबत एकदम घनिष्ठ संबंध असल्याचे समोर येत आहे.</p>



<p>भररस्त्यात वाढदिवसाचा जल्लोष</p>



<p>व्हिडिओत आरोपी आयाज हा भररस्त्यात वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसते. रस्त्याच्या मध्यभागी एक टेबल आणि त्यावर केक दिसतो. आरोपी केक कापतो. त्याचे मित्र टाळ्या वाजवतात. यावेळी आकाशात आतषबाजी करण्यात येते. मित्र आणि इतर लोक त्याला केक खाऊ घालतात. तर त्याचवेळी एक पोलीस त्याला केक खाऊ घालतो. तर इतर आरोपी पोलिसांना केक खाऊ घालताना दिसतात. भररस्त्यात वाढदिवस साजरा करण्याविषयी विचारणा करण्याऐवजी पोलिसच त्याला केक खाऊ घालत असल्याचे दिसते. त्यामुळे पोलिसांच्या एकूणच वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.</p>



<p>अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणात वातावरण तापले आहे. उद्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, एसआयटीचे प्रमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व अन्य महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बारा वाजता बैठक घेणार आहेत. त्यानंतर परतवाडामध्ये देखील बावनकुळे भेट देतील.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>

<!--
Performance optimized by W3 Total Cache. Learn more: https://www.boldgrid.com/w3-total-cache/

Object Caching 44/140 objects using Disk
Page Caching using Disk: Enhanced 
Minified using Disk
Database Caching using Disk (Request-wide modification query)

Served from: pcbtoday.in @ 2026-04-20 10:11:33 by W3 Total Cache
-->