कार्यकर्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत पक्ष टिकून राहणार – अमोल कोल्हे

0
353

मुंबई, दि. २० (पीसीबी) – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजपात प्रवेश केला. पक्षातून गेलेल्यांचा विचार करू नका. कार्यकर्ता नावाची वीट मजबुत आहे. तोपर्यंत भिंत मजबुत राहते. कार्यकर्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत पक्ष टिकून राहणार  खासदार अमोल कोल्हे  शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

वाळू जेवढी हातात घट्ट पकडून ठेवली तरी ती सरकून जाते त्यामुळे आजची गर्दी पाहिली तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही असेही कोल्हे म्हणाले.