0
590

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मुंबई महापालिकेने उच्च न्यायालायाच्या आदेशानंतर गणेश मंडळांना मंडपासाठी अटी टाकल्या आहेत. दक्षिण मुंबई, गिरगाव या भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जात नसल्याची तक्रार आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गणेशोत्सवावरुन सुरु असलेल्या वादावर पोस्टरबाजी करत शिवेसनेवर हल्लाबोल केला आहे. अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरुर बांधा, पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बांधा असा टोला मनसेने मारला आहे. शिवसेना भवनसमोर हे पोस्टर लावण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्यासंबंधी वक्तव्य केले होते.