Notifications

९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यात बंद नाही  

By PCB Author

August 08, 2018

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाने  महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. मात्र, या बंदमधून मुंबई आणि ठाण्याला वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर  परळीलाही वगळण्यात आले आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा समनव्यक समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच नवी मुंबईतही कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यात येणार नाही.  या चारही ठिकाणी फक्त ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.