Maharashtra

४८ पैकी ४० जागांवर भाजप विजयी झाला पाहिजे; मुख्यमंत्र्यांचे स्वबळाचे संकेत

By PCB Author

January 06, 2019

लातूर, दि. ६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देईल. त्यामुळे  ४८ पैकी ४० जागांवर भाजप विजयी झाला पाहिजे,   असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे आपले मत व्यक्त केले आहे. युतीच्या संभ्रमात राहू नका, तुम्ही तयारीला लागा, अशा सूचनाही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.

लातूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षाच्या संकल्प मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

यावेळी   फडणवीस  म्हणाले की, ‘कार्यकर्ता हाच भाजपाची सर्वत मोठी ताकद आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २  कोटी मते पडली पाहिजेत.  राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार असतील. मित्रपक्षांच्या जागांही यंदा भाजपाच लढेल. ४८ पैकी किमान ४० जागांवर आपण विजयी झाले पाहिजे.  मित्रपक्षांसोबत युती करायची की नाही हा अध्यक्षांचा विषय आहे, असे ते म्हणाले.