४३ कशाला ४८ जागांची तयारी करायला हवी; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला  

1443

मुंबई, दि. १० (पीसीबी) –  बारामतीसह ४३ जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छाच, पण ४३ कशाला त्यांनी ४८ जागांची तयारी करायला हवी, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  मुख्यमंत्र्यांना लगावला.

यावेळी शरद पवार यांनी भाजप नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला.  भाजपकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांना फारसे गांभिर्याने घेण्याची गरज नाही, असे  पवार म्हणाले. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचाही पवारांनी समाचार घेतला.

दरम्यान, पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन केले आहे. यावेळी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजप -शिवसेनेच्या २०१४च्या निवडणुकीत ४२ जागा जिंकून आल्या होत्या.  यावेळी ४३ जागा जिंकू. ही ४३ वी जागा बारामतीची असेल. येथे कमळ फुलवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले  होते.