२०२० नंतर ‘या’ प्रकारच्या वाहनांच्या विक्रीवर बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

0
626

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – देशभरात बीएस-४ इंजिनाच्या वाहनांची विक्री आणि नोंदणी १ एप्रिल २०२० पासून बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिले आहेत. दरम्यान गेल्या वर्षी न्यायालयाने बीएस-३ वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय दिला होता. तर भारतात २००० मध्ये पहिल्यांदा हे मानक लागू केले आहे.