२०१९ मध्ये जिंकायचे असेल, तर भाजपचे नेतृत्व नितीन गडकरींच्याकडे द्या – किशोर तिवारी  

0
442

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला  जिंकायचे असेल, तर  भाजपचे नेतृत्त्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी शेतकरी नेते  व महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांना पत्र लिहिले आहे.