Maharashtra

२०१९च्या निवडणुकीत मोदी संघाचा बळीचा बकरा होतील – अॅड. प्रकाश आंबेडकर

By PCB Author

October 13, 2018

नाशिक, दि. १३ (पीसीबी) – सध्या देशाची अत्यंत वाईट स्थिती  आहे. त्यातच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार  टीका केली आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचा बळीचा बकरा होतील, अशी टीका भारीप बहुजन पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

यावेळी आंबेडकर म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येणार नाही, अशी संघाची खात्री झाली आहे. त्यामुळे भय्या जोशींच्या विधाने मला हिटलरची आठवण झाली. हिटलरच्या सहकाऱ्यांनीसुद्धा हिटलरवर अविश्वास दाखवला होता. तसाच अविश्वास  आरएसएस आणि मोदींमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे नोटबंदी, न झालेले सर्जिकल स्ट्राइक आम्ही केल्याचे ते सांगत आहेत, अशीच संघाची भूमिका असेल.

दरम्यान, सरकार आले नाही तर कोणाला बळीचा बकरा केला जाणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तूर्तास मला त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसत आहेत. केवळ ते स्वत: बळी ठरतात की त्यांना बळी ठरवले जाते, हे  येणारा काळ ठरवेल, असेही ते म्हणाले.