Notifications

१५ बड्या उद्योजकांना लाभ होण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय; राहुल गांधींचा मोदीवर आरोप

By PCB Author

August 30, 2018

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १५ बड्या उद्योजकांना लाभ होण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला  होता. नोटाबंदीच्या एका निर्णयामुळेच देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देशातील  काळा पैसा पांढरा व्हावा, हेच या मागचे मुख्य उद्दीष्ट होते, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.