११ नाही तर १५ दिवसांत ठाकरे सरकार पडेल; रामदास आठवले यांचा दावा

0
379

सांगली,दि.२६(पीसीबी) – ११ दिवसांत नाही तर १५ दिवसांत सरकार पडेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते मिरज येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार ११ दिवसांत पडेल, असा दावा भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला होता, आता रामदास आठवले यांनी ११ दिवसांत नाही तर १५ दिवसांत सरकार पडेल, असा दावा केला आहे.

आठवले म्हणाले, ठाकरे सरकारमध्ये प्रचंड वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे हे सरकार फार दिवस चालेल असं मला वाटत नाही. तसेच सध्याची परिस्थिती पाहता हे सरकार १५ दिवसांत पडेल. महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे भाजप-शिवसेनेनं एकत्र यावं. आपण मिळून सरकार स्थापन करु, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं आहे.