Maharashtra

११ तारखेपासून भाजपच्या शेवटाची सुरूवात – छगन भुजबळ   

By PCB Author

December 13, 2018

पुणे, दि. १३ (पीसीबी) – विकासाच्या अजेंड्यावर भाजपने २०१४ च्या निवडणुका लढवल्या. मात्र,   विकास कुठे दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.   हनुमनाची जात काढून  जातीजातींत भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या  शेवटाची   सुरवात झाली आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.  

माजी केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह आणि भुजबळ यांनी घेतलेल्या पुण्यातील पत्रकार परिषद ते बोलत होते.

२०१४च्या निवडणुकीनंतर  मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेक नेते  भाजपमध्ये दाखल झाले. आता पुन्हा ते  घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.  त्यांचा भ्रमनिरास झाला असेल, तर त्यांनी स्वगृही यायला हरकत नाही, असे  भुजबळ म्हणाले. हमें अच्छे दिन नही, हमारे दिन चाहिये, असाही टोलाही त्यांनी भाजपला लगावला.