Maharashtra

१०० किलो सोने; रोख १६३ कोटी जप्त

By PCB Author

July 17, 2018

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – वाऱ्याचा वेग, लाटांची तीव्रता आणि हवा यांचा विचार करुन अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा तज्ज्ञांनी आराखडा तयार केला आहे. त्यामुळे स्मारकाची उंची कमी करण्यात आलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) विधानसभेत निवेदन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उंचीवरुन विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. आमदारांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिले. वाऱ्याचा वेग, लाटांची तीव्रता आणि हवा यांचा विचार करुन तज्ज्ञांनी आराखडा तयार केला आहे. स्मारकाची उंची कमी केलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.

राज्य सरकारने अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी करुन महाराजांच्या हातातील तलवारीची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आले होते. याचे पडसाद विधानसभेत उमटले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी वेलमध्ये येऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या. आमदार अब्दुल सत्तार यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्नही केला.