हैदराबाद, दि. १४ (पीसीबी) – हैदराबाद कसोटीत भारताने दहा गडी राखून वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली. या सामन्यात विंडीजने टीम इंडियाला विजयासाठी ७२ धावांचे माफक लक्ष्य दिले होते. सलामीच्या पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलने सतराव्या षटकात भारताचा विजय निश्चित केला.
Home Notifications हैदराबाद कसोटीत भारताचा दहा गडी राखून विजय; वेस्ट इंडिजविरूध्दची मालिका २-० जिंकली