हैदराबाद कसोटीत भारताचा दहा गडी राखून विजय; वेस्ट इंडिजविरूध्दची मालिका २-० जिंकली

0
527

हैदराबाद, दि. १४ (पीसीबी) – हैदराबाद कसोटीत भारताने दहा गडी राखून वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला.  या विजयासह भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली.  या सामन्यात विंडीजने टीम इंडियाला विजयासाठी ७२ धावांचे माफक लक्ष्य दिले होते. सलामीच्या पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलने सतराव्या षटकात  भारताचा विजय निश्चित केला.