‘हे’ तीन मुद्दे ठरले भाजपच्या विजयाचे शिल्पकार

0
342

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय संपादन केला. मोदी लाटेपुढे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष टिकू शकले नाहीत. भाजपने ही निवडणूक राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि गरिबांसाठीच्या योजना या मुद्द्यांवर लढवली. पक्षाचा संपूर्ण प्रचार या तीन मुद्द्यांवरच आधारित होता आणि याच मुद्द्यांचा प्रामुख्याने मोदी यांच्या विजयात मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होत आहे.

केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल हे गुरुवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळातच स्पष्ट झाले. सुरुवातीच्या दोन तासांमध्ये भाजपने २००हून अधिक जागांवर आघाडी मिळवली होती. संध्याकाळपर्यंत एकट्या भाजपने देशभरात काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या नाहीत, तितक्या फक्त उत्तर प्रदेशात मिळवल्या.