Maharashtra

‘हे तर फक्त तीन पक्षाचे सरकार, १९७८ ला किती पक्षांचे सरकार चालवले हे आठवत नाही’

By PCB Author

February 22, 2020

मुंबई , दि.२१ (पीसीबी) – ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले. आता या सरकारचे महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझा व्हिजन हा कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचा सहभाग आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘हे सरकार ५ वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही. सरकारचे नेतृत्व करणा-या व्यक्तीच्या स्वभावावर हे अवलंबून असते. त्यांची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे,’ असे म्हणत पवार यांनी हे सरकार ५ वर्षे चालणार असा विश्वास व्यक्त केला. ‘हे तर ३ पक्षांचे सरकार आहे, १९७८ ला मी किती पक्षांचे सरकार चालवले हे मला आठवत नाही,’ असे खा. शरद पवार माझा व्हिजन कार्यक्रमात बोलत होते. ‘शेतीवरचा भार कमी करायला हवा, शेतीवरील अवलंबून लोकसंख्या कमी झाली तर शेतीक्षेत्राचा विकास होईल, विकसित देशांचं हेच सूत्र आहे,’ असे पवार म्हणाले.