हुंडाबळीच्या प्रकरणात शहानिशा केल्याशिवाय पतीच्या कुटुंबीयांची नांवे नकोत – सर्वोच्च न्यायालय     

0
755

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – हुंडाबळीच्या प्रकरणात जोपर्यंत पतीच्या कुटुंबीयांचा सहभाग असल्याची शहानिशा होत नाही, तोपर्यंत त्यांची नावे या प्रकरणात घेण्यात येऊ नयेत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे कौटुंबिक वाद आणि हुंडाबळी सारख्या प्रकरणात नाहक अडकवल्या  जाणाऱ्या सासरच्या मंडळींना मोठा दिलासा मिळाला आहे.