Desh

ही वेळ राजकारणाची नाही, सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत आहोत- राहुल गांधी

By PCB Author

February 15, 2019

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या आत्म्यावरील हल्ला असून ही वेळ राजकारणाची नाही. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष अशा प्रसंगी केंद्र सरकारसोबत आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

पुलवामा येथे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने घडवलेल्या आत्मघाती स्फोटात ३९ जवान शहीद झाले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली.