“ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती”

0
623

मुंबई,दि.२७(पीसीबी) – ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा या मुद्द्यावरुन दिल्लीत हिंसाचार उसळला आहे. अशातच दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली करण्यात आली आहे. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे.

आव्हाड म्हणाले, ‘भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणावर कारवाई का केली नाही’ असा दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारणारे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मुरलीधर यांना त्यांच्या कर्तव्याचे बक्षीस म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

दरम्यान, बुधवारी न्यायमूर्ती मुरलीधर यांनी दिल्ली हिंसाचार सुनावणी प्रकरणात भाजप नेते कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्यावर अजून एफआयआर का दाखल नाही, असं विचारत पोलिसांवर कडक ताशेरे ओढले होते. त्यांनतर त्यांची एका दिवसात बदली करण्यात आली आहे.