पुणे, दि. २८ (पीसीबी) – हिंमत असेल तर सरकार बरखास्त करून टाका, मग बघू पुन्हा कोण निवडून येतंय, असे थेट आव्हान सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनी दिले आहे. मराठा आरक्षणासाठी बैठक बोलवण्यापेक्षा तीन दिवसांचे अधिवेशन बोलवा, असा सल्लाही भालके यांनी सरकारला दिला.