हिंदू धर्मातील अनिष्ट रुढीवर समाज माध्यमातून टीका करणे गुन्हा नाही – उच्च न्यायालय

0
351

औरंगाबाद, दि. १८ (पीसीबी) – हिंदू धर्मातील अनिष्ट रुढी, वर्णव्यवस्था, पुराणकथा, अंधश्रद्धा यांच्यावर समाज माध्यमातून टीका करणे, हा गुन्हा होत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.  या प्रकरणी पाचही आरोपींवर गुन्हे रद्द करण्याची सूचना करत  खंडपीठाने समाज माध्यमावर  टीका-टिपण्णीबाबत महत्त्वपूर्ण मत  नोंदवले  आहे.