मुंबई, दि.१८ (पीसीबी) : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणौतने वादग्रस्त वक्तव्य करत ‘भारताला १९४७ साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली’, असं विधान केलं. कंगनाच्या या विधानाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘कंगनाच्या वक्तव्याशी मी सहमत आहे’, असे सांगत तिला समर्थन दिले. विक्रम गोखले यांनी कंगनाला समर्थन करताच त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. दरम्यान, एका मराठमोळ्या निर्मात्याने भविष्यात कधीही विक्रम गोखले यांच्यासोबत काम करणार नाही असे जाहिर केले आहे.
मी विक्रम गोखले बरोबर काम केले आहे, कलाकार म्हणुन मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना रानावत जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्या बरोबर काम करणार नाही हे पण घोषीत करतो. pic.twitter.com/ZqMrnX7zPc
— Nilesh Navalakha । निलेश नवलाखा (@nileshnavalakha) November 14, 2021
‘शाळा’, ‘फँड्री’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते निलेश नवलाखा यांनी केलेले ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘मी विक्रम गोखले बरोबर काम केले आहे, कलाकार म्हणून मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना राणौत जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्या बरोबर काम करणार नाही हे पण घोषीत करतो’ असे ट्वीट निलेश यांनी केले आहे.