Maharashtra

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण:”…मग त्यावेळी रामदास आठवले पुढे का आले नाहीत?”- स्वरा भास्कर

By PCB Author

September 30, 2020

मुंबई, दि.३०(पीसीबी) : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. यामुळे अभिनेत्री पायल घोषला रामदास आठवले यांनी पाठिंबा देत तिला ‘वाय श्रेणी’तील सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी केली. मात्र आता यावर संतप्त प्रतिक्रिया अभिनेत्री स्वरा भास्करने दिली आहे.

आठवलेंना सवाल करत स्वरा म्हणाली कि, “उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज उपचारांदरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. या पीडितेच्या मदतीसाठी रामदास आठवले पुढे का आले नाहीत? स्वरा पुढे असंही म्हणाली कि, या पीडितेच्या कुटुंबीयांना आठवलेंच्या मदतीची गरज अधिक जास्त होती.