…हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरावं – संभाजीराजे

0
399

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत भीक मागून मदत गोळा केली होती. यावर संभाजीराजे यांनीस्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाहीअस विधान केले होते याला तावडे यांनी उत्तर दिले होते.

तावडे यांनी बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे असे उत्तर दिले होते.

यावर पुन्हा संभाजीराजेंनी ट्वीट करून उत्तर दिले आहे. त्यांनी ‘छत्रपती घराण्याच्या वतीने एकच सल्ला, लोकनियुक्त सरकारच्या मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरावं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन मदत पोहोचवावी. कोल्हापूर सांगली तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासीयांची सुद्धा हीच स्पष्ट भावना आहे अस विधान केले आहे.