मुंबई, दि. १० (पीसीबी) – काँग्रेससोबत मी १० ते १५ वर्षे राहिलो होतो. आता भाजपसोबतही मला त्याहून अधिक काळ राहावे लागेल. जोवर सरकार आहे, तोवर मी येथेच आहे. नंतर मी हवेचा अंदाज घेऊनच निर्णय घेणार आहे, असे सूचक विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यामुळे आठवले आगामी काळात भाजपची सोबत सोडणार की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.