हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे एक्झिट पोलचे अंदाज चुकतील – नाना पटोले

0
503

नागपूर, दि. २० (पीसीबी) – केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात  हवामानाचे अंदाज चुकले आहेत,  त्याप्रमाणे मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल)  आडाखे चुकतील, असे  काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी आज (सोमवार) येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

नाना पटोले म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. अर्ध्यापेक्षा जास्त गावामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजांप्रमाणेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल चुकतील.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) सर्वाधिक जागा मिळतील, असा दावाही नाना पटोले यांनी यावेळी केला. दरम्यान,  नाना पटोले यांनी नागपूर मतदारसंघातून भाजपचे वजनदार नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली .  त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.