पिंपरी, दि. १४ (पीसीबी)- आंध्रप्रदेशातील स्थलांतरीत झालेल्या गोरगरीब नागरिकांच्या चिमुरड्या मुलांना खाऊवाटप करून स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने आज (बुधवार) बालदिन साजरा करण्यात आला.
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप यांच्या पुढाकाराने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील मधुकर पवळे उड्डाण पुलालगतच्या मुलांना खाऊवाटप करण्यात आले.
यावेळी निरजा देशपांडे, अरूणा सुर्यवंशी, ऊर्मिला चौरे, जयश्री वीरकर, संतोष शेटे आदी उपस्थित होते.