Maharashtra

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त

By PCB Author

December 11, 2019

सोलापूर,दि.११(पीसीबी) –स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी संपूर्णपणे बरखास्त करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूरमध्ये संघटनेच्या अधिवेशनात शेट्टी यांनी प्रदेश पातळीपासून गाव पातळीवरील सर्व पदे बरखास्त केल्याची घोषणा केली.

राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची दोन वर्षासाठी एकाचवेळी नेमणूक करण्यात येणार आहे. विभागीय राज्य पातळीवर शिस्तपालन समिती कार्यरत होणार आहेत. देश ते गाव पातळीवरील पदे निवडीचा कार्यक्रम पुढील महिनाभरात पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.