स्वातंत्र्य दिनी भारत-पाकचे मिठाई देवाण-घेवाण बंद

0
516

अटारी, दि. १४ (पीसीबी) – पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्टला तर भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टला आहे. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून भारत-पाकिस्तानचे जवान वाघा बॉर्डवर १४ ऑगस्ट रोजी मिठाईची देवाण-घेवाण करून स्वातंत्र्य दिन साजरा करतात. अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा यावर्षी पाकिस्तानने मोडली आहे.

आज पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. परंतु, अटारी वाघा-बॉर्डरवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी मिठाईची देवाण-घेवाण करण्यात आली नाही. भारताने जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष राज्याच दर्जा रद्द केल्याने पाक चांगलाच खवळला आहे. तसेच भारत-पाकिस्तानमधील समझोता एक्स्प्रेस, दिल्ली-लाहोर बससेवा देखील बंद करण्यात आली आहे.