Notifications

‘स्त्रीहट्ट, बालहट्ट याप्रमाणेच जो एक ‘आधारहट्ट’ निर्माण झाला होता तो आता संपुष्टात’-उद्धव ठाकरे

By PCB Author

September 28, 2018

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डसंबंधी दिलेल्या निर्णयाचे कौतुक करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे मोदी सरकारच्या आधारसक्तीचा ‘परीघ’ कमी झाला आहे. स्त्रीहट्ट, बालहट्ट याप्रमाणेच जो एक ‘आधारहट्ट’ निर्माण झाला होता तो आता संपुष्टात येईल. नागरिकांचे दैनंदिन जीवन आधारच्या विळख्यात अडकविण्याचा सरकारचा प्रयत्न होता. सर्वोच्च न्यायालयाने या विळख्यातून देशवासीयांची सुटका केली हे बरेच झाले असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.