सैफ अली खान पद्मश्री पुरस्कार भारत सरकारला परत करणार!!!

0
710

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – अभिनेता सैफ अली खानने आपल्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार भारत सरकारला परत करण्याची इच्छा अरबाज खानच्या एका टॉक शोमध्ये व्यक्त केली आहे.

सैफ अली खानला दहा वर्षांपूर्वी हा पुरस्कार मिळाला होता. बॉलिवूडमध्ये अजुनही असे अनेक कलाकार आहेत की ते खरोखर या पुरस्कारासाठी पात्र आहेत. त्यांना अजुनही हा सन्मान मिळाला नाही. खरे तर मी स्वतःला या पुरस्काराच्या लायकीचा मानत नाही. त्यामुळे, हा सन्मान भारत सरकारला परत करणार आहे असे सैफने सांगितले आहे.